काय लिहावे तेच कळत नाही...
काहीही लिहिले तरी त्याचे सुर जुळत नाही...
मी तुझी आठवण काढतो..
हे सुद्धा तुला पटत नाही..
तुझ्या शब्दवाचुन मला काही ऐकू येत नाही
तुझ्याशिवाय मला काहीच दिसत नाही
तू माझ्या शब्दात,माझ्या कवितेत..
अणि माझ्या मनाताही..
तुझ्यावाचुन मी म्हणजे?
जसे जिवाविना शरीर...
असेही मी कधी गृहीत धरत नाही..
कारण हे शब्दच मला आवडत नाहीत..
तू समजशील मला वेडा
किवा नक्कीच खुळा..
पण हे नक्की आहे की ,
मी नक्कीच आठवतोय तुला...
शेवटी काय तू म्हणजे एक स्वप्न..
जे कधीही सत्यात येऊ शकते...
आज नाही तर उद्या
तुलाही माझी आठवण येऊ शकते...हो ना...!!!



0 comments:
Post a Comment